समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण; अन् फडणवीसांनी सांगितली ‘त्या’ बोगद्याची खासियत

Inauguration of the last phase of Samruddhi Highway; and Fadnavis explained the special feature of tunnel on Samruddhi: इगतपुरी येथे आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह कॅबिनेटमधील इतर मंत्री आणि आधिकारी उपस्थित होते. लोकार्पणानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गवरील इगतपुरी येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याची खासियत सांगितली.
समृद्धी महामार्गाला एकूण खर्च किती? अजितदादांनी संपूर्ण खर्चच समजून सांगितला…
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीच्या सरकारकरीता आनंदाची गोष्ट आहे. जे स्वप्न आम्ही 2014 नंतर आम्ही पाहिले होते. त्याची पूर्तता आज होत आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाहीये महाराष्ट्राच्या इकॉनॉमी च कॉरिडॉर आहे. महाराष्ट्राचे 24 जिल्हे jnpt शी कनेक्ट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर आता या शेवटच्या टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले आहे.
Video : फडणवीसांनी गाडी चालवयाला घेताच गाडीने…, अजितदादांनी सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान या समृद्धी महामार्गाची खासियत सांगताना फडणवीस म्हणाले की, या रस्त्यावर वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये. यासाठी संरचने करण्यात आले आहेत. 92 ओव्हर पास आणि 8 अंडर पास करण्यात आले आहेत. तसेच एकूण 7 बोगदे केले आहेत. तर इगतपुरी ते आमले या दरम्यान ज्याचं लोकार्पण आज पार पडलं. आपण जिथे आहोत देशातला सर्वाधिक रुंद बोगदा आहे. याचा रेकॉर्ड आपणच तोडू पुणे मुंबई सी लिंकचा बोगदा झाल्यावर. एखाद्या कागदावर चित्र काढावे असे इंटरचेंज समृद्धी महामार्गावर पाहायला मिळत आहे.
समृद्धीची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल; हर्षवर्धन सपकाळांचं खुलं चॅलेंज
तर या बोगद्याची खासियत सांगायची म्हटलं तर तापमान 60 डिग्रीच्यावर जाईल तेव्हा पाऊस पडायला सुरवात होईल 30 डिग्री झाल्यावर बंद होईल. स्थानिक प्रजाती वापरून 33 लाखाहून अधिक लागवड करण्यात आली आहे. रस्ता तयार करताना 1 हजार शेततळी तयार करण्यात आलेली आहे. 200 मेगा वॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे 22 ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत.कोकणापासून , नागपूरपर्यंत गॅस पाइपलाइन पोहचणार आहे उद्योगधंद्यांना गॅस मिळणार आहे. धार्मिक स्थळ जोडण्याचे काम केले आहे. अनेक जणांना वाटत होत हे काम होणार नाही विक्रमी वेळेत भूसंपादन केले. आम्हाला शक्तीपीठ महामार्ग आम्हाल तयार करायचे आहे. त्याचेही काम लवकरच सुरू करू. एक इंजिनिअरिंग मार्वल आपण याठिकाणी तयार केला. असं म्हणत फडणवीसांनी या बोगद्याची वैशिष्ट्य सांगतले.